Friday, March 26, 2010

मोनोपोली

प्रश्नांना उत्तर देता आले असते तर...

कुठलेच प्रश्न अनूत्तरीत राहिले नसते...

पण मग प्रश्नाचे महत्व कोणाला कळालेच नसते...

स्व:ताचे अस्तित्व टिकवण्यासाठी त्याची हि मोनोपोली.


प्रश्नाला प्रती प्रश्न विचारून गुंगवता येते..

पण तो हाडाचा प्रश्न असतो...

प्रश्न हा गुणधर्म त्याच्यात इतका चिटकलेला असतो कि

एका ठराविक रेषेपर्यंत तो सगळ्यांना मोकळीक देईल हि

हिंडा, बागडा मनाला वाटेल तसा धिंगाणा घाला .... पण...

पण त्या अस्पष्ट रेषे जवळ आलो कि प्रश्न पडतातच...

अन सुरु होतो पुन्हा मोनोपोलीचा खेळ.



© सचिन चाफेरकर.